अगदी मनात भरून राहणारा विषय — कॉलेजच्या दिवसांतलं प्रेम! त्या दिवसांमध्ये असतो एक वेगळाच गंध… पहिली नजर, पहिलं हसू, वर्गातली ती जागा, कट्ट्यावरच्या गप्पा, आणि न सांगता आलेल्या भावना.
काही वेळा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच कविता बनतो. या भागात अशा काही ओळी आहेत ज्या स्वतःशीच केलेल्या संवादासारख्या वाटतात – थोडं प्रश्नांचं आणि थोडं उत्तरांचं रूप घेऊन
अव्यक्त प्रेम – एक साठवून ठेवलेली भावना, जी उघड करायचं धाडस आजही त्याच्याकडे नाही. म्हणून आज शब्द त्याचे साथीदार झालेत.
कधी काही नातं संपून जातं, पण त्या नात्याचं अस्तित्व मात्र शब्दांमध्ये जिवंत राहतं. ती व्यक्ती दूर गेलेली असते, पण तिच्या आठवणी अजूनही लेखणीला चालना देतात.
तुझ्या जाण्यानं रिकामं वाटलं खरं, पण शून्यातूनही नवं काही उगम पावतं, हे आज जाणवतंय.
जेव्हा ती नसते, तेव्हा आयुष्याचा तोलच बिघडतो, आणि मनातले सर्व हिशोब फसतात…
प्रतीक्षेची, आशेची आणि अनुत्तरित प्रश्नांनी भरलेल्या मनाची एक शांत पण खोल खोलवर जाणारी हाक.
जेव्हा नातं, भावना, आणि आशा सर्व काही विरून जातं, आणि उरते एक शांत शून्यता…
कधी काळी अनेक चेहरे, अनेक क्षण, अनेक आठवणी मनात घर करून असतात. पण काही माणसं अशी असतात की त्यांचं अस्तित्व इतकं खोलवर रुतून बसतं, की बाकी सगळं विसरून जातं.
तीची आठवण नुसती वेदनादायक नाही, तर कधी हळवी, कधी गोड, आणि कधी अगदी अव्यक्त असते. पावसाच्या थेंबासारखी, हलकी पण खोल परिणाम करणारी.